Login

Login page

Simple Login Page

Username Password

शनिवार, १३ ऑक्टोबर, २०१२


शतावरी
      
शतावरी ही एक काटेरी, आरोहिणी वेल आहे. हिची पाने बारीक असून सुरुच्या पानासारखी असतात. फाद्यावर साधारणपणे १ सें. मी. लाबीचे वाकदार काटे असून ते खालच्या बाजूस वाकलेले असताता. पाने २ ते ६ च्या संख्येच्या गुच्छात उगवणारे २ ते सें. मी. पर्यंत लांब असतात. फुले पांढन्या किंवा गुलाबी रंगाची असून गुच्छात येतात. फळ वाठाण्याच्या आकाराचे असून त्यामध्ये एक किंवा दोन बिया मिन्यच्या आकाराच्या असतात. झाडाची मुळे जाड, लांबट गोल  असून दोन्ही टोकाकडे निमुळती असतात. यांनाच कंद असे म्हणतात. कंद पांढरे असतात व ते एका झाडाला १०० पर्यंत असू शकतात. यामुळेच या वनस्पतीला शतावरी असे नांव पडले आहे.

शतावरीला शास्त्रीय परिभाषेत Asparagus racemosus असे म्हणतात. ही वनस्पती Liliaceae या कुटुंबातील आहे. शतावरी बी मुळची भारतीय असून उष्ण व समशितोष्ण कटिबंधात समुद्र सपाटीपासून ४००० फूट उंचीपर्यत सर्व देशभर वाढतांना दिसते.

आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे.  त्याला भातीची शतावरी असे म्हणतात. यालाचा शास्त्रीय परिभाषेत Asparagus officinalis असे म्हणतात. अमेरिकेतील कँलिफोर्निया, फ्रांसमधील मिलील फोर्ट, चीनमधील तायवान, जपान वगैरे देशात अँस्परागस भाजी प्रचारात आहे. अँस्परागसची  लागवड पूर्वीपासून काशमीर, भुतान या थंड प्रदेशात प्रचलीत आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटँमीन ए व सीस पोटँशियम, रायबोफ्लेवीन व थायमीन ही ओशधी तत्वे आहेत. या कोंबापासून चविष्ट असे सुप तयार केले जाते. मेरी वाँशिंग्टन ह्गा जातीची आपल्याकडे शिफारस केली जाते.

उपयोगः  
औशधी उपयोगी शतावरीच्या कंदामध्ये सँपोनीन, ग्लायकोसाईडस, फॉस्फरस, रायबोफ्लेवीन, थायमीन, पोटँशियम, कँलशियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृध्दी, मुतखडा,, अपस्मार रक्तशुध्दी यासाठी केला जातो. स्त्रियांसाठी शतावरी इतके दुसरे उत्तम औषध नाही. कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशी मध्ये जास्त दूध देण्यासाठी केला जातो. शोभेचे झाड म्हणून सुध्दा शतावरी घरोघरी लावलेली दिसते. शतावरी कल्प शतावरीच्या कंदापासून बनविला जातो. हा कल्प दुधातून नियमीत घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसचे शतावरीपासून तयार केलेले नारायण तेल अर्धांगवायू व संधीवातावक गुणकारी आहे. शतावरी वाढलेला रक्तदाब कमी करीत असल्याने हृदय रोगात वापरतात. तसेच ही स्मृतीवर्धक कार्य करते. स्त्रियांमध्ये सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.

आधार: शेती फायद्याची औषधी सुगंधी वनस्पती-(फेब्रुवारी-२००५), डाँपंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला

एक विचार

·         उपास-तापास, नवस आणि जागरणांचासीझनआहे. जो तो देवाला खूश करायच्या मागे लागला आहे. कुणी बाबांच्या वाऱ्या करतात, तर कुणी दर्शनाचा अतिरेक करतात. उपासाच्या नावाखाली पोट फाटेस्तोवर उपासाचे पदार्थ खाल्ले जातात. जागृत मानल्या जाणाऱ्या स्थळांवर मोठमोठे नवस मागितले जातात. आवडीच्या गोष्टी सोडणे, मंदिरांना दान देणे, आठवड्यात एक चक्कर टाकणे हे सर्वही त्याचबरोबर सुरू होते. या सर्वांचे कारण एकच - ’स्वार्थ’. काहीतरी हवे, काहीतरी मिळावे म्हणून देवाला याप्रकारे मस्का मारला जातो. असेच भिकाऱ्यासारखे हात पसरत माणूस सारखे काही ना काही मागत राहतो. गाडी, बंगला, चांगली नोकरी... ही यादी संपत नाही. मात्र भीक मागण्यात आयुष्य संपून जाते. आपले कुटुंब, ऑफिसमधील सहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहक यांच्या मनाचा, विचारांचा, गरजांचा विचार करायला वेळच उरत नाही. दगडासमोर डोकं टेकण्यात तल्लीन झालेला मनुष्य जिवंत जीवांना विसरून जातो. अशाने देव अजिबात खूश होत नाही. दुसऱ्यांची मने दुखवणाऱ्यांवर देव खूष होईल तरी कसा! घरातल्या देव्हाऱ्यातल्या देवासमोर उभे राहायला दोन मिनिटं नसणारे लालबागच्या राजासमोर सात तास रांगा लावतात. याला भक्ती म्हणत नाहीत. स्वामी विवेकानंदांनी म्हटले तेच खरे - मनुष्यसेवा ही खरी देवपूजा आहे.
आपल्या अवतीभोवती असलेल्यांची मने सांभाळा, सर्वांशी प्रेमाने वागा, जगावर थोडा विश्वास ठेवा. ही खरी पूजा. चार वाईट लोक भेटले की सगळेच वाईट दिसू लागतात. दोन दु:खद प्रसंग घडले की, नशीब खोटे वाटू लागते. नजर जाईल तिथे खोटेपणा, लबाडी आणि त्रास पाहण्याची सवय होते. मनात कपट, द्वेष, शंका आणि लबाडी ठेवून केलेली पूजा ही पूजा नसून वेडेपणाच आहे. स्वच्छ, शांत आणि प्रेमळ मन हा भक्तीचा पाया, बाकी सगळे नंतर. इमारतीचा चाळीसावा माळा कुणालाही भावेल, पण त्यासाठी पायाही मजबूत हवाच ना. पूजा, उपास, नवस वगैरे आयुष्याच्या इमारतीतला चाळीसावा माळा आहे. अत्यंत देखणा आहे, पण स्वशुद्धीचा पाया आधी नीट बाधुन घ्या. वाईटाने माखलेले मन घेऊन कोणत्याही देवळात गेलात, कितीही उपास केलेत किंवा कोणताही नवस मागितलात तरी पदरी निराशाच येणार. बनवणाऱ्याला चालवता येते, देवाकडेकरप्शनहा प्रकार चालत नाही. तिथे लाच देऊन चांगले आयुष्य घेता येत नाही. तिथे चालते फक्त मनुष्यप्रेमाचे नाणे.
देवाने बनवलेल्या सृष्टिवर त्याने आकारलेल्या मनुष्यावर प्रेम करणाऱ्यांची इथे हुकुमत असते हे समजून घ्या. देव दगडाचा जरी दिसत असला तरी दगडाचे भक्त बनू नका?